All Information Related to Women Health And Their Issues like Obstetrics,Pregnancy,Superstitions Mahila Arogya

Tuesday, July 6, 2021

कुटुंब नियोजन कसे करावे?


कुटुंब नियोजन कसे करावे?



कुटुंब नियोजन साधनाचा उपयोग ,कुटुंब नियोजन करण्यासाठीच  केला जातो.
कुटुंब नियोजन साधनांचा उपयोग ,गरोदरपण लांबवण्यास उपयोग होतो. 
कुटुंब नियोजन समजण्यासाठी स्त्री बीज निर्मिती कधी होते ते माहित पाहिजे. 
संतती नियमाच्या साधनांचा उपयोग दोन मुलांमध्ये योग्य अंतर ठेवण्यासाठी होतो. 

अनेक वेळा गरोदर राहिल्यानंतर पुढील गर्भधारणा टाळण्याकरिता होतो. 

प्रसुतिपश्चात मातेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. 

प्रसुतिनंतर प्रशिक्षित व्यक्तिकडून (डॉक्टर, नर्स,प्रशिक्षित दाई ) यांचेकडून नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. पहिले ८ ते १० दिवस रोज तपासणी होणे आवश्यक आहे. त्यानंतर ६ आठवड्यांपर्यंत दर आठवडयाला तपासणी होणे आवश्यक आहे. त्यानंतर सहा महिन्यांपर्यंत दर महिन्याला तपासणी होणे आवश्यक आहे. 

प्रसुतिपश्चात काळात जनेनेन्द्रीयांचा जंतूदोष टाळण्यासाठी स्वच्छ कपडे व वैयक्तिक स्वच्छता याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. 

प्रसुतिनंतर लवकरात लवकर (त्वरीत) स्तनपान चालू करावे. ते माता व बालक या दोघांच्याही फायदयाचे आहे. प्रसुतीनंतर लगेच किंवा नंतर केव्हाही रक्तस्रावाचे प्रमाण जास्त वाटल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. 

जास्त प्रमाणात ताप येणे, झटके येणे, शुद्ध हरपणे, अशी लक्षणे असल्यास तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी होणे आवश्यक आहे. 

प्रसुतिपश्चात काळात पुरेसा चौरस व सकस आहाराची गरज आहे. व तो मातेला दिला पाहिजे. 

रक्तक्षयाच्या प्रतिबंधासाठी १०० दिवसांपर्यंत लोहयुक्त गोळ्या घेणे आवश्यक आहे. 

१ ते २ महिन्यानंतर हळूहळू पूर्वीचे सर्व कामकाज सुरु करावे. 

प्रसुतिपश्चात काळात मातेची योग्य काळजी घेऊन मातामृत्युचे प्रमाण निश्चितपणे कमी होऊ शकते. 

पाळणा लांबविण्याचा वा थांबविण्याचा योग्य सल्ला देऊन त्यासाठी मातेला प्रवृत्त करणे आवश्यक आहे. 

कुटुंब नियोजन कसे करावे? 

कुटुंबनियोजनाच्या पध्दती

तात्पुरत्या पध्दती (पाळणा लांबवणे)

या पध्दतीचा उपयोग केवळ पाळणा लांबवण्यासाठी नाही तर गर्भधारणेसाठी योग्य वेळ निवडण्यासाठीही केला पाहिजे. या पध्दती दोन प्रकारच्या आहेत-नैसर्गिक आणि कृत्रिम.


नैसर्गिक पध्दती

1. शरीरसंबंध न ठेवणे (ब्रह्मचर्य)
2. शरीरसंबंधात लवकर अलग होणे.
3. स्तनपानाचे पहिले वर्ष
4. फलनाचे दिवस टाळून शरीरसंबंध सुरक्षाकाळ

1. शरीरसंबंध न ठेवणे (ब्रह्मचर्य)

ही पध्दत बरीच प्रचलित आहे. मात्र यासाठी दोघांनाही मानसिक संयम असला पाहिजे. आधुनिक काळात ही पध्दत फार प्रचलित नाही. सुलभ साधने असताना मानसिक निग्रह पाळण्याची गरज राहिलेली नाही. धार्मिक व्यवस्थेत मात्र ब्रह्मचर्य टिकूनआहे.

2.लवकर अलग होणे

स्त्रीपुरुषसंबंधात वीर्य सोडण्याच्या आधी स्त्रीपुरुषांनी अलग होणे एक चांगली पध्दत आहे. पण या पध्दतीला बराच संयम आणि समंजसपणा लागेल. लैंगिक समाधानाच्या दृष्टीने ही पध्दत थोडी कमी समाधान देणारी आहे. पुरुषाचे वीर्य निदान बाहेर सांडून तरी त्याच्या दृष्टीने क्रिया पूर्ण होते. पण स्त्रीला मात्र या पध्दतीने लैंगिक क्रिया पूर्ण होण्याचा आनंद मिळेलच असे नाही. बोटांचा वापर योनिमार्गात करून (हस्तमैथून) ही उणीव भरून काढता येते. या पध्दतीत आणखी एक अडचण अशी की प्रत्यक्ष वीर्यपतनाच्या आधी पुरुष-इंद्रियातून पाझरणारे स्राव पूर्ण निर्बीज नसतात, त्यात थोडया का होईना शुक्रपेशी असण्याची शक्यता असते. एकूण या पध्दतीत बरीच तयारी लागते आणि शंभर टक्के यशाची खात्री देता येत नाही. इतर कोणतेही साधन जवळ नसल्यास हा मार्ग उपयोगी आहे.


3.स्तनपान

स्तनपानामुळे स्त्रीबीजनिर्मिती काही महिने टळते. जोपर्यंत स्तनपान चालू आहे तोपर्यंत मेंदू-स्त्रीबीजग्रंथी यामध्ये विशिष्ट चक्र चालू असते. यामुळे स्त्रीबीजे पक्व होणे, सुटणे, आदी क्रिया थांबतात. मासिक पाळीही या काळात येत नाही. अर्थात या पध्दतीची खात्री अगदी शंभर टक्के देता येत नाही. काही स्त्रियांना या काळात गर्भ राहतो आणि ते लवकर कळतही नाही. पण बहुतेक स्त्रियांना वर्षभर तरी याचा संततिप्रतिबंधक म्हणून फायदा होतो. स्त्रीबीजनिर्मितीची प्रक्रिया आणि जननसंस्थेतल्या बदलांची माहिती स्त्रियांना असली पाहिजे. विशेषतः गर्भाशयमुखामधून पाझरणारा स्राव/चिकटा पारदर्शक, तार धरणारा झाला की स्त्रीबीज येते आहे हे कळू शकते. याची माहिती पुढे येईलच.

4.सुरक्षाकाळ पध्दती


पाळीचा पहिला दिवस धरला तर सुमारे 14व्या दिवशी स्त्रीबीज सुटते. स्त्रीबीज बाहेर पडण्याच्या आगेमागे तीन-चार दिवस स्त्रीपुरुष संबंध टाळला तर गर्भधारणा होऊ शकत नाही. कारण गर्भधारणेचा काळ तेवढाच असतो. म्हणून पाळी संपल्यानंतरचे दहा दिवस व पुढची पाळी यायच्या आधीचे दहा दिवस गर्भधारणेचे नसतात. मधले आठ ते दहा दिवस मात्र गर्भधारणा होऊ शकते. म्हणून हे मधले दिवस कुटुंबनियोजनाच्या दृष्टीने लैंगिक संबंध टाळण्याचे आहेत. या पध्दतीस कोणतेही साधन लागत नाही. तिथी, तारीख नीट लक्षात ठेवली तर अडचण येत नाही. मात्र अंदाज चुकण्याची शक्यता नेहमीच असते. शिवाय सर्वच स्त्रियांचे मासिक चक्र नियमित नसते. ही पध्दत वापरण्यासाठी संयम लागतो.

संततिप्रतिबंधनासाठी कृत्रिम पध्दती

*निरोध – पुरुषाचा
*निरोध – स्त्रियांचा
*वीर्यनाशक जेली
*तांबी
*स्त्री संप्रेरके

तसेच 

कायमस्वरूपी पध्दत 

कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया स्त्री व पुरुष या दोघांना करता येऊ शकते.कुटुंब नियोजन साधनाचा उपयोग करून कुटुंब नियोजन करण्यात येते.कुटुंब नियोजन केल्याने महिलांचे आरोग्य व्यवस्थित राहते. कुटुंब नियोजन केल्यामुळे लोकसंख्या नियंत्रित राहते.


@crazycervix 



No comments:

Post a Comment